दहावीचा निकाल कधी लागणार? शिक्षण मंत्र्याने दिली माहिती
SSC Result 2024 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. या निकालानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत माहिती दिली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल देखील २७ मे पर्यंत लागणार असल्याचं सांगितलं आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया २४ तारखेपासून सुरु होत आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते तर इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रवेशप्रक्रिया होते, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
हेही वाचा – पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश
बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस अगोद जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता.मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदानं होणं बाकी होतं. त्यामुळं राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला असं दीपक केसरकर म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचं असल्यास ते बसू शकतात, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.
बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारल्यानं आनंद आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला आहे त्यामुळं तिथल्या मुलांचं अभिनंदन करतो. १६ जुलैच्या दरम्यान पुन्हा परीक्षा होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी आहे. ऑगस्टमध्ये निकाल जाहीर होईल, असंही दीपक केसरकर म्हणाले.